पाठ २. संतवाणी (अ) अंकिला मी दास तुझा

१)  धरणी – धरती, भूमी
२)  वन – जंगल, रान
३)  मेघ – ढग
४)  काजा – कामास

‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगात संत नामदेवांनी आई व बाळाच्या उदाहरणाद्वारे आपले व परमेश्वराचे नाते सांगितले आहे.
    आगीच्या तडाख्यात सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी जशी त्याची दयाळू, प्रेमळ आई धाव घेते, तसा तू माझ्यासाठी धाव घेतोस. मी तुला शरण आलेला दास आहे, असा भाव संतकवी नामदेव विठ्ठलाजवळ व्यक्त करत आहेत. आई-बाळाच्या उदाहरणाद्वारे कवीची परमेश्वर भेटीची तीव्रता, कळकळ व्यक्त होते. भक्ती, प्रेम, विरह, व्याकुळता अशा सर्व भावभावना उत्कटपणे येथे व्यक्‍त झाल्या आहेत. आई-मुलाच्या नात्यातील प्रेम कवी स्वत:च्या व भगवंताच्या नात्यात शोधू पाहतो.
    नि:स्वार्थ भावनेने मुलाला अखंड जपणारी आई ज्याप्रमाणे मुलाला संकटापासून दूर करते त्याचप्रमाणे माझी विठूमाऊली माझ्यासाठी नेहमीच धावत येते. या उत्कट प्रेमनेच मला परमेश्वराचा दास केले आहे. असा परमेश्‍वरावरील अपार प्रेमभाव व अतूट श्रद्था नामदेवांनी येथे व्यक्‍त केली आहे.

कवी – संत नामदेव

कवितेचा विषय – परमेश्‍वर भेटीची तीव्र इच्छा

पिल्ले जमिनीवर कोसळताच पक्षीण लगेच तेथे झेप घेते.

‘अंकिला मी दास तुझा’ हा अभंग मला फार आवडतो, कारण अभंगाची भाषा साधी-सरळ आहे. अत्यंत मोजक्या शब्दांत विविध दृष्टान्त (उदाहरणे) देऊन नामदेवांनी आपला उत्कट भाव कवितेत व्यक्‍त केला आहे. छोटे छोटे चरण (ओळी) वापरून नेमका अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. अभंगात ‘बिंदूमध्ये सिंधू’ म्हणजेच कमी शब्दांत खूप अर्थ व्यक्‍त करण्याची शक्‍ती आहे, हे या अभंगातून दिसून येते. ही संतकविता गाता येते. तसेच, ती वाचनीय, श्रवणीय असल्यामुळे मला फार आवडते.

प्रस्तुत अभंगातून संत नामदेव परमेश्‍वराला आई मानून त्याने त्याच्या मुलाप्रमाणे आपला सांभाळ करावा अशी आळवणी करतात. मूल ज्याप्रमाणे आपल्या आईवर पूर्णपणे अवलंबून असते त्याप्रमाणे आपणही परमेश्‍वरचरणी पूर्णपणे लीन व्हावे. यामुळे, परमेश्‍वर आपल्या भेटीसाठी आतुरतेने धाव घेईल असा विश्‍वास ते या अभंगातून व्यक्‍त करतात.

१)  अंकिला – अंकित झालेला
२)  माता – आई, जननी
३)  दास – सेवक 
४)  मेघ – ढग

error: Content is protected !!