हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले.
ज्याप्रमाणे पोलाद झोतभट्टीत प्रचंड तापमानावर शेकून नवनिर्मितीकरता वापरले जाते, तसे माझेही आयुष्य जीवनातील अडीअडचणींच्या, दुःखाच्या, अनुभवांच्या भट्टीत छान शेकून निघाले.
i. विश्व ii. आयुष्य, जीवन iii. दोस्त, सखा, सवंगडी iv. दिन
‘दोन दिवस’ ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करते.
कष्टकऱ्याचे संपूर्ण आयुष्य अखंड परिश्रम करण्यात निघून जाते. आयुष्यात काही दिवस सुखाची वाट पाहत जगावे लागते, तर काही दिवस दु:ख, दारिद्र्याशी झुंजावे लागते. आजवरचे सगळे आयुष्य जरी असेच दिवसादिवसांनी सरत गेले, तरीही त्यापुढील आयुष्यात असे किती तापदायक उन्हाळे सहन करावे लागणार आहेत याची गणती नसते. असे तापदायक आयुष्य जगणाऱ्या कष्टकरी कामगाराच्या जीवनाचे दर्शन यात घडते.
कवी – नारायण सुर्वे
कवितेचा विषय – कष्टकऱ्याच्या जीवनाचे वास्तव व त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रेखाटणे.
आभाळात शेकडो वेळा चंद्र उगवला, तारे उमलले आणि सुखमयी, धुंदावणाऱ्या रात्री आल्या; पण रोजची भूक भागवण्यासाठी खाव्या लागणाऱ्या खस्ता, कराव्या लागणाऱ्या मेहनतीतच माझे सारे आयुष्य निघून गेले.
i. रजनी, निशा ii. मदत iii. तापावे iv. शशी
‘दोन दिवस’ या कवितेत कवी नारायण सुर्वे यांनी मांडलेले कामगारांचे भावविश्व जीवनाचा एक वेगळाच पैलू दाखवते. अडीअडचणींच्या काळातही जीवनाकडे पाहण्याचा आशादायी व सकारात्मक दृष्टिकोन देते. कवीने साध्या-सोप्या भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. ही गद्याशी नाते सांगणारी निवेदनात्मक लेखनशैली मला फार आवडली. भाकरीचा चंद्र, माना उंचावलेले किंवा कलम झालेले हात अशा सुंदर कल्पना मला फार आवडल्या. जीवनाचे धगधगीत वास्तव रेखाटतानाही कामगाराचे जीवन जगण्यावरील प्रेम कायम आहे, ते प्रेम टिपणारी ही कविता मला फार आवडते.